हल्ली मुले ऐकतात का? — वय वर्षे ८ ते १२ मुलांशी संवाद

‘हल्ली मुले ऐकतात का?’
दहापैकी नऊ पालकांच्या तोंडातून दिवसातून दहा वेळा येणारे हे वाक्य !
कसे बोलायचे?, कुणी बोलायचे?, कधी बोलायचे? आणि सर्वात महत्वाचे म्हणजे काय बोलायचे? — हा सगळ्यात मोठा पेच प्रसंग पालकांसमोर, शिक्षकांसमोर आणि मुलांशी संपर्कात असलेल्या सर्वांसमोर असतो.
वय वर्षे ८ ते १२ वयोगटातील मुले ऐकून न ऐकल्यासारखे करणे, उलट उत्तरे देणे अशा विविध प्रकारे संवादामध्ये अडथळे आणतात. पालकही मग चिडून बोलूयात नकोत अशा भूमिकेत जातात.
रविवार दि. २४ मार्च २०१९ रोजी सकाळी ११ ते दुपारी १ या वेळात या विषयावर परिसंवाद आयोजित केला आहे. पालकत्व तज्ञ डॉ. सुजाता फडके या विषयावर पालकांशी मनमोकळेपणे चर्चा करतील.
स्थळ – कृष्णाबाई खंबदकोण बालक पालक मार्गदर्शन केंद्र, नाडकर्णी बाल कल्याण केंद्र, चित्रकार केतकर मार्ग, डहाणूकर कॉलेजमागे, विले पारले (पूर्व)
वेळ – रविवार दि. २४ मार्च २०१९ सकाळी ११ ते दुपारी १

अधिक माहितीसाठी आणि नोंदणीसाठी कृपया ०२२-२६११७१९५ वर संपर्क साधा. अथवा श्रीमती मंगल दांडेकर (९३२२२१६३६२) यांच्याशी संपर्क साधावा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top